गोविंद विश्वास या बंगाली शेतकऱ्यावर गावगुंडाचा प्राणघातक हल्ला!
गडचिरोली (प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
शिवणी येथे वास्तव्याने असलेले.गावात वास्तव्य करून भाडे तत्वावर दुसऱ्यांची शेती करून आपल्या कुटुंबियांची उपजीविका चालविणारे गोविंद विश्वास ही व्यक्ती आपल्या शेतामध्ये टरबूज व मक्का या पिकाची लागवड केलेली असताना.गावातील काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या गावगुंडांनी त्यांच्या शेतातील टरबूज व मक्याची चोरी करताना गुन्हेगारास रंगे हात पकडले असता.
तिरुपती बोरकुटे या गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीने गावातील मनोज उइके व इतर काही गुन्हेगारांना पाठीशी घालून संगनमताने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून काठीने जबरजस्त मारहाण केली
सदर घटनेची तोंडी तक्रार मी माझ्या फोनवरून गायकवाळ यांना दिली. गुन्हेगारांवर आतापर्यंत कोणतीच कारवाई न करता उलट मलाच समाज देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या गावगुंडा मुळे माझ्या जीवितास धोका असून माझे जगणेही या गुन्हेगारांनी मुश्किल केलेले आहे. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाही करण्याची मागणी गोविंद विश्वास यांनी केलेली आहे.

