लग्न समारंभातून परतणाऱ्या वऱ्हाडी कुटुंबीयांनवर दुःखाचा डोंगर!
गडचिरोली ( विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
लग्न समारंभ आटोपून आपल्या गावाकडे सुखरूप परत येत असणाऱ्या M.H.46.P.5352
या क्रमांकाच्या स्कार्पिओ वाहनाला आड वळणावर एका प्रवासी वाहनाने जोराची धडक दिल्यामुळे. या भीषण अपघातात स्कार्पिओ वाहनातील 5 लोक मृत्युमुखी पडलेली असून.7 लोक गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहेत.
गंभीर अवस्थेत पडलेल्या वऱ्हाडी लोकांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती केलेले असून.गंभीर अवस्थेत पडलेल्या जखमी लोकांनवर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू केलेले आहेत.
जखमी व मृत्यू मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून. झालेल्या भीषण दुर्घटनेमुळे गाव परिसरात सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
जखमी व मृत्युमुखी पडलेल्या प्रवासी लोकांनच्या कुटुंबियांना अनेक स्तरावरून आर्थिक मदतिची मागणी जोर धरत आहे.

