आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
शेतकरी कामगार पक्ष.
गडचिरोली (वि. प्रतिनिधी)
विचार क्रांती न्यूज
संपादक.
अनुप मेश्राम.
मुख्यमंत्र्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचा दिलेला आदेश हा राजकीय द्वेष भावनेतून केलेला असून, सत्ताधाऱ्यांच्या शेकडो आश्रमशाळांमध्ये सुद्धा त्यापेक्षाही अतिशय भयानक परिस्थिती असतानांही सुध्दा शासनाने संस्थापकांना पाठीशी घालण्याचे काम सुरू ठेवलेले आहे.
आदिवासी मुलांच्या शिक्षणात राजकारण आणण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी न करता शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा,
राज्यात सर्वात मोठा बजेट या विभागाचा असताना आदिवासी विद्यार्थ्यांना सुविधा पुरवू न शकलेल्या आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
मंत्र्यांनी अशा दुखद प्रसंगी राजीनामा न दिल्यास मंत्र्याच्या मुंबईतील शासकीय बंगल्यासमोर आंदोलनाचा इशारा भाई रामदास जराते, भाई शामसुंदर उराडे, डॉ. गुरुदास सेमस्कर, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक नेते भाई अक्षय कोसनकर, रमेश चौखुंडे, प्रभाकर गव्हारे, डंबाजी भोयर, दामोदर रोहणकर, अशोक किरंगे, पांडुरंग गव्हारे, तुळशिदास भैसारे, राजू केळझरकर, चिरंजीव पेंदाम, चंद्रकांत भोयर, योगेश चापले, कविता ठाकरे, सोनाली कवडो, रोहिणी उईके, कविता मेश्राम, संगिता चांदेकर इत्यादीने दिलेला आहे.

