बाम्हणी ग्रामपंचायतिने राबविले! मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान!
गडचिरोली (दि.15 जाने.)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
पंचायत समिती गडचिरोली व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बामणी ग्रामपंचायतिने नव्यानीच विकासात्मक पाऊल उचललेले असून विकासात्मक कामातून ग्रामपंचायतीचा व गावाचा चेहरा मोहराच बदलूवून टाकलेला आहे.
या अभियाना अंतर्गत ग्रामपंचायतीने सर्वप्रथम गावातील मेनगेटची रंगरंगोटी सुधा केलेली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या स्वरक्षण भिंतीचे रंगरंगोटी करून भिंतीवर अनेक महापुरुषांच्या प्रतिमेचे चित्रीकरण सुधा केलेलेआहे.
गावकऱ्यांना बसण्यासाठी नव्याने उमेद सभागृह कार्यालयाचे बांधकाम सुद्धा केलेले आहे. तसेच अंगणवाली व प्राथमिक शाळेचे सुशोभिकरण सुधा केलेले आहे.

ब्राम्हणी ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामपंचायत स्तरावर गावात अनेक उपक्रम राबविल्याल्यामुळे गावकऱ्यांनी या होत असलेल्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. सदर ही ग्रामपंचायत गावात कौतुकास्पद ठरलेली आहे.
ब्राम्हणी ग्रामपंचायतला आजपर्यंत अनेक ग्रामसेवक लाभलेले आहेत. त्यांनी विकासात्मक कामाकडे दुर्लक्ष करून. निवड पैसे कमवण्याचे धंदे केल्याचे गावकऱ्यात बोलले जात आहे.
नव्याने रुजू झालेले आणि लगेच विकासात्मक कामे हाती घेतलेले ग्रामसेवक सोनपिपरे यांचे गावकऱ्यांनी सुस्ती व अभिनंदन सुध्दा केलेले आहे.

