शासकिय निमशासकीय आंदोलनामुळे नागरिक त्रस्त.
गडचिरोली ( विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांति न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
जिल्हास्तरावर काही शासकीय निमशासकीय कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे .जिल्ह्यातील अनेक नागरिक त्रस्त झालेले असून. नागरिकाना आपल्या महत्वपूर्ण कार्यालयीन कमाना मुकावे लागत आहे.
पुकारलेले कामबंद आंदोलन सर्व सामान्य नागरिकाना येरझऱ्या घालणारे.मानसिक व आर्थिक त्रस्त करणारे व ग्रामीण भागातील जनतेचे कंबरडे मोडणारे आहे
पुकारलेले बेमुदत कामबंद आंदोलने त्वरित मागे घेऊन .कार्यालयात कामानिमित्य आलेल्या ग्रामीण व शहरी नागरिकांना सहकार्य करण्याची मागणी काही जाणकार नागरिकांनी केलेली आहे.
काही त्रस्त नागरिकांनी आपले मनोगत आमच्या सदर प्रतिनिधीपुढे सुध्दा व्यक्त केलेले आहे..

